Tuesday, October 13, 2009

Monday, October 12, 2009

मनस्वी मीनल!


मीनल ठाकूरने आग्रा येथील राष्ट्रीय स्पर्धेत बिलियर्डस आणि स्नूकर अशा दोन्ही गटांमध्ये विजेतेपद पटकावले. याआधी ती पूलमध्येही विजेती ठरली होती. "अकाउंट्‌स'चे चार ठिकाणी काम करीत "क्‍यू स्पोर्टस'मध्ये कारकीर्द घडवीत असलेल्या मीनलने आतापर्यंत स्वबळावर वाटचाल केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील यशानंतर आता तिच्याकडून जागतिक यशाची प्रतीक्षा आहे. तिच्याशी साधलेला संवाद.

मुकुंद पोतदार

कोणत्याही खेळात दोन बहिणी, दोन भाऊ, वडील-मुलगा, वडील-मुलगी अशा जोड्या असतील तर तुलनेला ऊत येत असतो. ही तुलना तज्ज्ञच नव्हे तर सर्वसामान्य प्रेक्षकही करीत असतात. खेळाडूंना कितीही नको असले तरी या तुलनेने सामोरे जावे लागतेच. त्यातही संगणकाच्या वापरामुळे काही सेकंदांमध्ये तमाम लेखा-जोखा समोर येतो. अर्थात खेळाडूंची इच्छा नसली तरी त्यांना अशा "तौलनिक भडिमारा'च्या दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागत असते. मुंबईची बिलियर्डसपटू मीनल ठाकूर हिचे काहीसे असेच झाले असावे. लहान बहीण अनुजा आणि ती दोघी "क्‍यू स्पोर्टस' आवडीने खेळायच्या. पण साडेतीन वर्षांनी लहान असलेल्या अनुजाला आधी यश मिळाले. अनुजा आधी राष्ट्रीय, तसेच जागतिक विजेतीही झाली. साऱ्या जगाला अनुजाचे यश दिसायचे, पण योग्य वेळी पुरस्कर्ते मिळाल्यामुळे तिची वाटचाल सुकर झाली होती, याची फार थोड्या जणांना कल्पना होती. मीनलचे यश कुणाला दिसत नव्हते, कारण ते तिला मिळत नव्हते, पण म्हणून ती मेहनतीत कुठेही कमी पडत नव्हती, फक्त तिला साथ नव्हती ती योग्य पुरस्काराची आणि किंचितच परंतु अनिवार्य अशा दैवाची...

आग्रा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मात्र मीनलने बिलियर्डस आणि स्नूकरमध्येही विजेतेपद मिळविले. आर्थिक पुरस्काराच्या आघाडीवर निराशाजनक चित्र असूनही मीनलने हार मानली नाही.

मीनल "क्रिकेट क्‍लब ऑफ इंडिया'च्या (सीसीआय) "सोसायटी'सह चार ठिकाणी "अकाउंट्‌स'चे काम करते. संध्याकाळी सहा-साडेसहा वाजता ही कामे संपवून ती धावतपळत हिंदू जिमखान्यावर जाते आणि तेथे सराव करते. तिने कोलकत्यात गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या राष्ट्रीय एट-बॉल पूल स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. मीनलचे ते पूलमधील पहिले राष्ट्रीय विजेतेपद होते. मीनलने 2004 मध्ये स्नूकरचे, तर 2006 मध्ये बिलियर्डसचे राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. पूल, बिलियर्डस आणि स्नूकर अशा तिन्ही प्रकारांमध्ये राष्ट्रीय विजेती असलेली ती एकमेव महिला खेळाडू आहे. पुरुषांमध्ये देवेंद्र जोशी आणि अलोक कुमार यांनाच असे "तिहेरी' यश मिळविता आले आहे. या यादीत गीत सेठी, पंकज अडवानी किंवा अनुजा ठाकूर यांचा समावेश नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. अर्थात म्हणून या जगज्जेत्यांनी सर्वोच्च पातळीवर संपादन केलेल्या यशाचे मोलही कमी होत नाही, याचाही उल्लेख करावा लागेल.

आग्रा येथील घवघवीत यशानंतर मीनलशी संपर्क साधला. मीनलकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोनही आता बदलला आहे. तिचा अनुजाशी उपांत्य सामना सुरू असताना पंकज अडवानी उपस्थित होता. मीनलने अत्यंत अवघड "पॉटिंग' केल्यानंतर तो चकित झाला. ""अनेक पुरुष खेळाडू सुद्धा इतक्‍या अवघड "अँगल'मधून "पॉटिंग'चे धाडस करीत नाहीत, अशी प्रतिक्रिया पंकजने नंतर व्यक्त केली,'' असे मीनलने सांगितले.

""अर्थार्जनासाठी चार ठिकाणी काम करावे लागणे, आर्थिक पुरस्कार नसणे, अशा वेळी सराव कसा केला,'' या प्रश्‍नावर मीनल म्हणाली, ""सकाळी दहा ते सहा अशा नोकरीमुळे मला इच्छा असूनही "क्‍यू स्पोर्टस'साठी झोकून देता येत नाही. जेमतेम तास-दीड तास मी सराव करू शकते. हिंदू जिमखान्यात मी ध्रुव सीतवाला, देवेंद्र जोशी, नंदू शहा, सिद्धार्थ पारिख यांच्याबरोबर सराव करते. आर्थिक पुरस्कार नसल्यामुळे मला प्रशिक्षणही घेता येत नाही. दिवंगत विल्सन जोन्स यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी जे काही शिकविले, त्यावरच माझी वाटचाल सुरू आहे.''

मीनलने राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक पातळीवरही गुणवत्तेची चुणूक दाखविली होती. 2006 मध्ये केंब्रिजमध्ये झालेल्या स्पर्धेत तिने इंग्लंडच्या क्रिस्टिना शार्प हिच्या साथीत अंतिम फेरी गाठली होती. त्याच वर्षी दोहा आशियायी क्रीडा स्पर्धेत "नाईन बॉल पूल'मध्ये तिचे पदक एका फेरीने हुकले होते.

आगामी उद्दिष्टांविषयी मीनल म्हणाली, ""28 ऑक्‍टोबरपासून आशियायी इनडोअर स्पर्धा होणार आहे. याशिवाय हैदराबादला जागतिक महिला स्नूकर स्पर्धा होणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीमुळे माझा आत्मविश्‍वास उंचावला आहे. आता एक टप्पा पुढे जात जागतिक दर्जाची कामगिरी करायची आहे.''

""अनुजाचे यश, तिच्याशी होणारा तुलना, याचे काही दडपण आले होते का,'" यावर मीनल शांतपणे म्हणाली, ""तिला आधी आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे तिची कामगिरी झाली. मी अजूनही मदतीची प्रतीक्षा करताना प्रयत्न सुरू ठेवत आहे. दुहेरी यशानंतर परिस्थिती बदलेल, अशी माझी आशा आहे.'' "अनुजाची मोठी बहीण' या छायेतून मीनल आता खऱ्या अर्थाने बाहेर पडली आहे. आता तिने खेळात "ताईगिरी' करावी हीच सदिच्छा आणि शुभेच्छा!

ब्रीजच्या रूपाने वरदान!

मीनलशी गप्पा मारताना एक वेगळीच माहिती मिळाली. तिला ब्रीजची प्रचंड हौस आहे. ती "ऑनलाइन' ब्रीज खेळते. अनेकदा तिचा जोडीदार असतो गीत सेठी! याविषयी मीनल म्हणाली, ""ब्रीजसाठी खूप एकाग्रता लागते. बिलियर्डससाठीही हा गुण आवश्‍यक असतो. ब्रीजमुळे तो जोपासता येतो. गीत सेठी म्हणूनच ब्रीज खेळतो. ब्रीज मला वरदानच ठरले आहे. नॉर्वेचे रॉजर मेडबाय हे सुद्धा "ऑनलाइन' असतात. पुण्याच्या सुबोध गुर्जर यांच्यामुळे त्यांची "इ-ओळख' झाली. मेडबाय चित्रकार, छायाचित्रकार, तत्त्वज्ञ, असे बरेच काही आहेत. त्यांच्याशी "चॅटिंग' करताना मला बहुमोल "टिप्स' मिळाल्या. अशाप्रकारे ब्रीज माझ्यासाठी वरदानच ठरले आहे.''

Wednesday, September 23, 2009

अमरनाथ यात्रेची "फोटो-स्टोरी' पाहण्यासाठी खालील लिंक तुमच्या ब्राऊजरमध्ये पेस्ट करा.

http://picasaweb.google.com/balmukund11/AMARNATHYATRA02#

कहाणी अमरनाथ यात्रेची!


सहा वर्षांपूर्वी आम्ही मित्र-मित्र काश्‍मीरला गेलो होतो. तेव्हा पहलगाम, श्रीनगर आणि गुलमर्ग अशी तीनच ठिकाणे पाहिली होती आणि येताना वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते.


पहलगामहून परत येताना एका जवानाशी गप्पा मारल्या. "मराठा लाईट इन्फंट्री'चा हा जवान मुळचा बेळगावी, पण मराठी होता. तो अमरनाथ यात्रेच्या बंदोबस्तासाठी आला होता. तेव्हा यात्रा सुरू व्हायची होती. त्याने यात्रेविषयी बरीच माहिती दिली. प्रत्यक्ष चालायला जेथून सुरवात होते, त्या चंदनवाडीला जाणारा मार्गही त्याने दाखविला. अमरनाथ यात्रेविषयी टीव्हीवर बरेच काही पाहिली होते, तसेच वाचलेही होते. त्यामुळे उत्सुकता होती. तेव्हापासून अमरनाथला जायचे मनात होते.


हा योग अखेर यावर्षी आला. किंवा आणला असा म्हणावे लागेल.पहलगामहून चढाई करायची आणि बालतालमार्गे उतरायचे असा "रूट' निश्‍चीत केला.


पहलगामहून पिस्सूटॉप हा पहिलाच मार्ग फार खडतर असतो. त्यासाठी प्रचंड तंदुरुस्ती लागते. पुण्यात अगदी दूध आणण्यासाठी "बाईक'वरून जाणाऱ्यांमध्ये माझा समावेश असल्यामुळे पहिल्याच टप्याला धापा टाकाव्या लागल्या. अखेर "सॅक' "पिठ्ठू'ला दिली. हा पिठ्ठू म्हणजे "भारवाहक काश्‍मीर कुमार'. यात्रेच्या काळात असे अनेक छोकरे वर्षभराची कमाई करीत असतात. हा पिठ्ठू अत्यंत चपळ गटात मोडणारा होता, तर मी चालून-चढून मोडलो होतो. पण पहिला टप्पा "भाररहित' अवस्थेत असताना सुद्धा पूर्ण करताना दमछाक झाली.


अखेर जोजपालला पोचलो. तेथे लंगरमध्ये थोडेफार खाल्ले. बरीच दमछाक झाल्यामुळे शेषनागचा पहिला टप्पा गाठणे अशक्‍य होते. त्यामुळे जोजपालच्या लंगरप्रमुखाची भेट घेऊन त्याला मुक्काम करू देण्याची विनंती केली. त्याने "अनुमती' दिली. ती रात्र तेथेच काढली.


सोलापूरची थंडी, मुंबईचा पावसाळा आणि ऊन्हाळा पचवला असला तरी त्या रात्री काश्‍मीरी थंडीने गारठून गेलो. पण सकाळी उठलो तेव्हा ताजातवाना झालो होतो. पुण्याहून निघाल्यापासून दोन दिवस अंघोळ केली नव्हती. त्यामुळे थंडगार-अल्हाददायक हवामान असूनही "चिक-चिक' होत होते.


अखेर मनाचा प्रचंड निर्धार करून बर्फाच्या वितळलेल्या पाण्याने अंघोळ केली!मग मागचा-पुढचा विचार न करता थेट घोडा केला. मार्ग फार खडतर असल्यामुळे त्याशिवाय पर्यायच नव्हता. मग माझ्या यात्रेला वेग आला. शेषनागचे अप्रतिम "झील' पाहून फार छान वाटले.


महागुनस्टॉप-पंचतर्णी असे करत "गुफा' गाठली. शेवटच्या टप्यापाशी गेल्यानंतर सुद्धा सुमारे शंभर-दोनशे पायऱ्या आहेत. यंदा प्रचंड बर्फ पडला असल्यामुळे सुमारे दहा फुट उंचीचे शिवलिंग तयार झाले होते. इतके भव्य शिवलींग पाहून धन्य झालो. सुमारे तीन वर्षांपूर्वी "ग्लोबल वॉर्मिंग'मुळे शिवलिंग जेमतेम तयार झाले होते. यावेळी मात्र ज्यांनी यात्रा केली ते भाग्यवान ठरले. कारण इतके उंच शिवलिंग अलिकडच्या वर्षांत प्रथमच तयार झाले होते!

Tuesday, September 22, 2009

बुद्धिबळासाठी आयुष्य वेचलेले भाऊसाहेब!


भाऊसाहेब पडसलगीकर यांचे नुकतेच निधन झाले. क्रीडा पत्रकारीता सुरु केल्यापासून नूतन बुद्धिबळ मंडळ, भाऊसाहेब पडसलगीकर आणि विविध स्पर्धांचे निकाल या गोष्टींशी दरवर्षी संबंध आला आणि काही वर्षांतच जणू काही ऋणानुबंधच जडला! भाऊसाहेबांना प्रत्यक्ष भेटण्याचा योगही आला. अगदी अलिकडे त्यांना भेटलो ते मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर यांच्या अकादमीच्या उद्‌घाटनाच्यावेळी.


वास्तविक एक डॉक्‍टर दुसऱ्या डॉक्‍टरविषयी (चांगले) बोलणे शक्‍य नसते. हल्ली "कोचिंग'चा "डिमांड' वाढल्यामुळे खेळाइतकीच प्रशिक्षणातही "चुरस' दिसून येते. स्वतः एक संयोजक, प्रशिक्षक असूनही भाऊसाहेब सांगलीहून पुण्याला आले आणि त्यांनी मृणालिनीला शुभेच्छा दिल्या. त्यांचे भाषणही औपचारीक नव्हते, तर ते मनापासून बोलले. यावरूनच त्यांना खेळाच्या विकासाची किती तळमळ होती, हे लक्षात आले.


या एका प्रसंगावरून भाऊसाहेबांच्या मनाचा मोठेपणा लक्षात येतो.भाऊसाहेब पडसलगीकर यांचा जन्म चार जुलै 1919 रोजी विंग (ता. कराड) येथे झाला. त्यांच्या घरात बुद्धिबळ चांगले रुजले होते. त्यांचे आजोबा, पणजोबा आणि वडील बुद्धिबळ खेळायचे. त्यांच्या घरातील प्रशस्त सोफ्यावर अनेक नामवंतांचे बुद्धिबळाचे डाव रंगले आहेत. त्यामुळे बुद्धिबळ भाऊसाहेबांना नवे नव्हते. अर्थात, त्यांनी या खेळाच्या आवडीला व्याप्त स्वरूप दिले. तसे करताना भाऊसाहेबांनी सांगली परिसरातीलच नव्हे, तर राज्यातील अनेकांच्या घराघरांत बुद्धिबळ पोचविले.


बुद्धिबळ खेळात काळाच्या ओघात अनेक बदल झाले. तांत्रिक आणि स्वरूप अशा दोन पातळ्यांवर होणाऱ्या बदलांचा भाऊसाहेबांनी सातत्याने आढावा घेतला आणि आपल्या प्रशिक्षणात त्यांचा समावेश केला. "बुद्धिबळ महोत्सवा'चे आयोजन हे भाऊसाहेबांचे मुख्य कार्य मानले जाते. मात्र, बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्यापुरतेच मर्यादित कार्य त्यांनी केले नाही. याउलट "सायमल्टेनियस', "ब्लाइंडफोल्ड', अशा विविध नव्या प्रकारांच्या डावांची प्रात्यक्षिके त्यांनी महाराष्ट्रातील गावागावांमध्ये केली. त्यांचे हे कार्यसुद्धा महोत्सवाच्या आयोजनाइतकेच बहुमोल आहे.सांगली बुद्धिबळ महोत्सवामध्ये त्यांनी असंख्य स्पर्धांचे आयोजन केले. तसे करताना त्यांनी प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांना संधी मिळेल, याची दक्षता घेतली. या महोत्सवामुळे देशातील अनेक मातब्बर एकवेळ पुण्या-मुंबईत खेळलेले नसायचे, पण सांगलीला त्यांनी आवर्जून भेट दिलेली असायची.


यामुळे सांगली ही भाऊसाहेबांची कर्मभूमी असली तरी त्यांचे कार्यक्षेत्र देशव्यापी होते, असे म्हणणे अजिबात अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. महाराष्ट्राच्या अधिकाधिक मुलांनी हा खेळ खेळायला हवा, इतकेच नव्हे तर त्यांनी एलो गुणांकन कमवावे, विविध किताब मिळवावेत, अशी भाऊसाहेबांची तळमळ होती. महोत्सवाचे आयोजन करण्यामागे त्यांचा हाच उद्देश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाल्यामुळे भाऊसाहेबांच्या प्रत्येक गोष्टीत काटेकोरपणा आणि शिस्त असायची. एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी आयुष्य वेचते, असे म्हटले जाते. बुद्धिबळासाठी हे कार्य कुणी केले, या प्रश्‍नाचे उत्तर भाऊसाहेबांच्या रूपाने सापडते.

Saturday, September 19, 2009

अरेच्चा, "चॅटींग'ला च्याट मारायची राहीलीच की....


कलीच्या अवकृपेमुळे उदयास आलेल्या "संवाद' (??????????????) साधनांवर आता बहुतेक काही खंडांचा ग्रंथच होईल असे दिसतेय. पहिल्या अध्यायानंतर आता दुसरा अध्याय सुचला आहे. किंवा फार तर पहिल्या अध्यायात काही भार घालता येईल, असे वाटले आहे. त्यामुळे दुसऱ्या अध्यायाची भर घालण्यासाठी हा "ब्लॉगप्रपंच'!!!!!!!!!

खंड, ग्रंथ असे संकेत देताना किंवा सुतोवाच करताना एकता कपूरच्या "के' सिरीजमधील सिरीयलप्रमाणे अनंत (इन्फीनीटी) भागांचा मारा करण्याचा उद्देश नाही, हे सुरवातीलाच नमूद करतो.पेजर ते ट्‌वीटर या मालिकेत "चॅटिंग' हे अजूनही बरेच लोकप्रिय असलेले "संवाद माध्यम' आहे. पूर्वी "चॅटिंग'बाबत लोक अनभिज्ञ होते. मात्र नंतर अगदी चोर, भामटे, स्त्रीलंपट अशी सर्वच मंडळी "चॅटिंग किंग' बनली. चॅटींगच्या माध्यमातून जुळलेले अनेक विवाह मोडकळीस आले.

गंधर्व विवाह, प्रेम विवाह, राक्षस विवाह, असे काही विवाहाचे प्रकार असतात, असे मी समाजशास्त्राच्या पुस्तकात वाचले होते. मात्र "चॅटिंग' विवाह असा नवा पायंड कलीने निर्माण केला आणि विवाहसंस्थेत भर पडली.

काचा विकण्या, बसवण्याचा (फोडण्याचा नव्हे!!!!!!!!) धंदा करणारे आमचे एक मित्र आहेत. त्यांच्या एका मैत्रीणीचे याच माध्यमातून लग्न ठरले होते. मात्र "चॅटींग' करणारा प्रत्यक्षात "चाटू' असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने नकार दिला, मात्र त्या हरामखोर चाटूने तिच्यावर अत्याचार केले.

चोर धावण्यात म्हणजे चोरी करून पळून जाण्यात तरबेज असतात. भारतातील असे अनेक चोर मिळाल्यास आणि त्यांच्यावर चांगले संस्कार (!) केल्यास-म्हणजे त्यांना चायनावाल्यांप्रमाणे "ट्रेनिंग' दिल्यास भारत ऍथलेटिक्‍समध्ये सुवर्णपदकांची लयलुट केल्याशिवाय राहणार नाही, असे आमच्यातील (क्रीडातज्ञ पी. मुकुंद) आम्हास मनातल्या मनात सांगतो आहे.

असो...तर हे स्वगत थांबवितो आणि आता तुमच्याशी संवाद साधतो. तर मुद्दा असा की, आता "चॅटिंग' करणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणे, गळ्यात फास टाकून घेणे, हातात तुरी घेण्यासारखे झाले आहे. "चॅटिंग' करणे म्हणजे कुणाच्या तरी जाळ्यात फसणे असे होण्याचा जास्त डेंजर असतो. त्यामुळे चॅटिंगद्वारे चाटूगिरी किंवा चेटूक करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. कलीने निर्माण केलेल्या अत्याधुनिक संवाद साधनांमध्ये चॅटिंग हा प्रकार लै म्हणजे लै म्हणजे लै म्हणजे लै डेंजरस वाटतो.

पेजर ते ट्‌वीटर ः कलीयुगातील "संवादा'चे "अवतार'

कसे असते बघा...पूर्वी "पेजर' असलेली मंडळी भाव खायची. "बीप-बीप'झाल्यावर पेजर काढून शायनिंग मारायची. नंतर सर्वांनाच पेजरचा कंटाळा आला.एक रूपया खर्चून फोन करावा लागणार फुकटचा (पण पैसा विकतचा जाणार) अशीचीडचीड व्हायची.

नंतर आला मोबाईल. लोक जाम खुश झाले. मोबाईलवाले लै भावमारायचे. "रिंगटोन' मुद्दाम मोठे ठेवायचे. पण नंतर अगदी मोलकरीण, हमाल,रिक्षावाले, अशा सर्वांकडेच मोबाईल आले.

दरम्यानच्या काळात मोबाईलचाहीपब्लीकला "नॉशीया' आला. "रिंगटोन' कितीही मधूर असली, पण ती वाजल्यावरप्रचंड वैताग येतो, असे चित्र सर्रास दिसू लागले. अगदी "एसएमएस' आला तरीजी लोक शायनिंग मारायची, तीच आता "एसएमएस' शीळा झाला तरी बघत नसतात, असेआम्हाला सर्वेक्षणाअंती दिसून आले आहे.

मोबाईलने भाव मारणे जुनेपुराणेहोते न होते तोच "इ-मेल' आले. "पेजर, मोबाईल हुआ तो क्‍या हुआ? तुम्हारेपास "मेल' है क्‍या? ' असे आपल्याला ऐकून घ्यावे लागणार नाही, याचीदक्षता घेत लोक भराभर "आयडी' काढू लागले. काही जणांनी कंपनी आणि स्वतःचेदोन "आयडी' काढले. इतके करून आपण मंडळी थांबतो काय? सबीर भाटीयाचे "मेल'"हॉट' असेपर्यंत आपण तेथे मैलामैली केली. मग "याहू' वाल्यांनी "बोंब'ठोकताच आपण "याहू-याहू' असे म्हणत "याहू पे मैं भी हू...' असे घोषवाक्‍यघोकत बसलो. दरम्यान "रिडीफ' वाल्यांची थोडी क्रेझ येऊन गेली. मग यालाटेवर स्वार झाले ते "जी मेल'! "जी हॉं, मै जी-मेल भी हू' असे म्हणत आपणतेथे "जी-जी-' करू लागलो. पूर्वी "जी-मेल' वाल्यांनी मैलामैली (फुकटची)करणाऱ्यांची भाऊगर्दी नको म्हणून 50 नव्या लींक देण्याचे "कॉपीराईट'आद्यजीमेलधारकांना प्रदान केले. (आता जी-मेल वाले सुद्धा फुकट अकाऊंट ओपनकरू देतात..बहुतेक त्यांना "आयसीआयसीआय' वाल्यांचे मार्केटींगबहाद्दरभेटले असतील...)

अशाप्रकारे आपण मंडळींनी सर्वच "इ-मेल पुरवठादारांकड'खाते थकविले. (जीबीचा कोटा संपल्याचा -निर्वाणीचा - इशारा देणारा संदेशआल्याशिवाय आपण मेल डीलीट करीत नव्हतो. माझ्या माहीतीत सचिन तेंडुलकरच्यावन-डे आणि टेस्ट क्रिकेटमधील धावांइतकेच "मेसेज' इनबॉक्‍समध्ये असलेलेमेल-चालक आहेत...)

मैला-मैली करून मंडळी वैतागत असतानाच ब्लॉग' आला. आपलाब्लॉग असावा, तो लोकांनी वाचावा, त्यावर "कॉमेंटा' टाकाव्यात असे लोकांनावाटू लागले. मग कुनीपन उठून ब्लॉग काठू लागले. नंतर ब्लॉगचालकांनाब्लॉगवर पोस्ट टाकण्याचा, त्यांनी त्या टाकल्यातरी लोकांना त्यावाचण्याचा, वाचल्या तरी "कॉमेंटा' टाकण्याचाही वैताग येऊ लागला. ब्लॉग"ब्लॉक' होण्याची वेळ आली आहे. अर्थात काही मंडळी निर्धाराने ब्लॉग अपडेटकरीत असतात आणि त्यांचा कंटेट सुद्धा भन्नाट असतो.

पण ब्लॉग चालविणे हामोठाच उद्योग असतो. हल्ली वेळ ही "डायनोसॉर'च्या सांगाजड्यासारखी दुर्मिळअसल्यामुळे कुणालाच सापडत नसते. शेवटी रिकामटेकड्यांना वेळ मिळणे अवघडचअसते.)ब्लॉग जुनेपुराणे होताच..सोशल नेटवर्कींगचे पेव फुटले होते."ऑर्कुट' आपणे दळण कुटत बसायचे दिवस आले. ती क्रेझ झाली. मग "फेसबुक'आले. मात्र या दोन्ही गोष्टी मेंटन करण्यासाठी वेळ तुलनेने जास्त लागतो.त्यामुळे "शॉर्ट-बट-स्टीव' असे "ट्‌वीट' आले.येथे फकस्त 140 चॅरॅक्‍टरचीमर्यादा आहे. ती बघताबघता फस्त होते. आणि अपडेट पण लगेच होते.

मंत्रीमहोदय शशी थरूर यांनी "ट्‌वीटर' जाम फेमस केली आहे. त्यामुळे सध्याट्‌वीटरची चलती आहे.एकंदरीत काय तर हा कलीयुगाचा महिमा आहे. "गळाभेट'घेण्याचे दिवस संपले आहेत. आधुनिक संवादाची (?) अशी नवनवीन साधने येतजाणार आणि आपण त्यामागे धावणार. भेटी होतात. पाचवी पुजणे, बारसे, जावळ,मुंज, सोडमुंज, साखरपुडा, लग्न, मग नवविवाहीत जोडप्यांच्या दोन हातातूनझालेले चार हात,,मग पुन्हा पाचवी पुजणे....असा क्रम!!!!!!

कालांतरानेसहस्त्रचंद्रदर्शन, पंच्याहत्तरी, साठी, अशी उलटगणतीही होत असते. पण मंगलकार्यालयात भेटलेली मंडळी जेवणापुरतेच हात मोकळे ठेवतात. एरवी कुणीमोबाईल करीत असते किंवा त्यांना आलेला तरी असतो....)काय करणार? शशी थरूर,सबीर भाटीटा, नोकीया-मोटोरोला वाले नव्हे तर हा "कली'च दोषी आहे....